थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

ही माझी दूसरी कविता..२००४ मधे लिहलेली. जास्त कही शब्दात मांडता आल नाही...
एकतेपणची भावना, guilty feeling हे सगळ दाखवायच होत...
पण आता तिला बदलत नाही..
माझा हा नेम बर्याच लोकांना आवडत नाही..
पण मी लिहलेला शब्द कधीच खोडत नाही..
त्यामुळे क्षमस्व


अथांग पाण्यामधे मी एक चेहरा पहिला होता
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता

हातात हात ठेवणारे,
ठेवून हात मागणारे,
सर्व लगेच भिरकावणारे,
वारे जसे उडून जावे............
दिवसामधले क्षण सारे,
कामांमधले मन सारे,
मनामधले चंचल वारे,
सर्व सोबत घेउन जावे.........

मग समुद्राच्या लाटेसमोर, तो नम्रपणे वाकला होता
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

निखार्याने जळलेला,
मनासाहित मळलेला,
उन्हामधे पोळलेला,
शिक्षा भोगतो जगण्याची.......
जमिनिसरखा तड़कलेला,
पाण्यासाठी तडफडलेला,
आगीमध्ये भड़कलेला,
वाट पाहतो मरणाची.......
मग मात्र खिन्न होवून, श्वास त्याचा थांबला होता..
थव्यातला पक्षी आज एकटा राहिला होता....

अम्बरीश
१२/०१/२००४

No comments: