बस एकच जगणे लिहायचे !!!!!!

मी पुन्हा मोजायची का, तीच किम्मत जगण्याची
का इथे नाहीच जगणे, फ़क्त वाट ही मरणाची
का मीच सांगू जगाला, आज भाषा या मनाची
तेच जगणे, तेच मरणे, हीच वाट जीवनाची

"नाही" म्हणणे कुणास कळले, फ़क्त भोगिले दू:ख सारे
तरीही रडते मग झगड़ते, का वाहती विरुद्ध वारे
परी मोजुन श्वास ठोके, दिवस पुढे ढकलायचे का?
रोज मारुनी उठायचे अन्, रोज उठुनी मरायचे का?

भोगले ते शाप होते, आणि भोगही पाप होते
दूर कोसंवर नभातिल, तारकांचे कोप होते
नशीब म्हणता हेच सारे, रटाळ तरीही जगायचे का?
याच धरतीवर पुन्हा मी, मतिसवे उडायचे का?

डोंगराची कुठे ऊँची, सावली मज सोसवेना
पाहू मी वरती कुणा, कुणी भावना ही पोचवेना
दिव्या कुणी असते म्हणे ते, शहाणे सारे सांगताती
रक्तात हात, डोळ्यात आसू, तरीही स्तुति खरडून गाती

कुणीही नाही सोबत आता, फ़क्त जखमा सर्व अंगी
चौमुखी आहे म्हणे तो, कुणी म्हणे तो भास्मांगी
जर दिसे त्याला जगाची, सर्व दू:खे सर्व लोकी
मीच का उरतो असा की, टाकिला इतरात बाकी

वर बघुनी मिटती डोळे, जग हे सारे वेंधळे रे
आस ठेउनी उन्चावारी, वर मृगजळी सपळे रे
लिहले पाहिले ललाटी तर, का हे मरणे जगायचे
लिहणार्यानेच द्यावे वचन, बस एकच जगणे लिहायचे

बस एकच जगणे लिहायचे !!!!!!


अम्बरीश
१२/०८/२००६

No comments: