या कवितेला "The CreativeBytes" तर्फे झालेल्या काव्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते..
तसेच राहुल देशपांडे, यांनी या कवितेचे कौतुक केले होते..
मातीचा गंध
उठे सुगंध
होई निर्बंध
कसा हा दरवळला...
सुगंधी श्वास
हाती आकाश
असा विश्वास
मनामधे सळसळला
गर्द ते मेघ
काजळी रेघ
आज उद्वेग
त्वचेवर सरसरला
नभ तो नीळा
ढगांचा टीळा
घेउनी खुळा
बघ कसा गडगडला
अश्रुमय अक्ष
टाकी कटाक्ष
बघतेस लक्ष
लक्ष पाउस धारा
मनाचे बांध
करी निर्बंध
असा तो शित
संथ वाहे वारा
दिसतसे क्षितिज
त्यागतो आज
त्यामधे अब्ज
अब्ज मी किरणाहुती
केशरी रंग
त्यामधे दंग
गावुनी अभंग
गंधली ही माती
अम्बरीश
१०/१०/२००५
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment