एक नाटकात, आम्हाला एक कवितेसारखा dialog हवा होता. तो इथे लिहला आहे..
कव्यान्जलिचे रसिक वाचक सहज context समजुन घेतील, याची खत्री आहे...
वाटत, त्या मार्गावरून, पुन्हा एकदा जावे
त्या अस्पष्ट संघर्षाला, पुन्हा समोरे जावे
पण मला अड़वतात त्या आठवणी......
ज्यांच्यासोबत मी राहिलो
ज्यांच्यासोबत मी लढलो
अन ज्यांच्यासोबत मी हरलो
पुन्हा तिकडे वळण्यासाठी, नाही म्हणतात सगळे
जाणत नाही कुणी, काही हिशोब राहिले मोकळे
पण पुन्हा मी एकदातरी.......
मी जाइल तिथे हरायला
मी जाइल तिथे लढायला
मी जाइल पुढे सरायला
आणि एक डाव असा जिंकुन येइल मी
मग सर्व जगाला दाखवेल कमी....
कारण मी जिंकुन घेतलेला ...
तो डाव असेल माझा
तो डाव असेल शेवटचा
तो डाव असेल मृत्यूची
हजार अभिमन्यु युद्धात या, जरी पडतील धारातीर्थी
चक्रव्यूह हेच तोडून जाइल, नर एक अन सोबत सार्थी
नर एक अन सोबत सार्थी ......
अम्बरीश
०६/०३/२००४
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment