नवरी .... (एक विदारक सत्य)

या कवितेच नाव ऐकल्यावर बरेच लोक विचार करतात की ही एक "नवरी" च वर्णन करणारी.. तिच सौन्दर्य वर्णन करणारी कविता आहे.. पण कविता ऐकून झाल्यावर मी बर्याच मुलींच्या डोळ्यात पाणी पहिल आहे.."मनाविरुद्ध लग्न" हे त्या मुलींनी भोगल असेल कदाचित...तुम्हीही नक्की वाचा


आणि जातांना ती वेगळीच हसली
डोळ्यांमधे पाणी होते .......
थरथरणार्या ओठांवर, माझेच नाव होते
मला माहित आहे, तो लाल रंग...
ते दागिने तिचा जीव घेत होते...

स्पर्श !.... स्पर्श आठवत असतील तिला
प्रेमाचे, करूणेचे ...... माझे
आणि आता .... संत्वानाचे
विस्कटलेल्या आठवणी एकवटून,
डोळ्यात सामावून जात होते
सरे बंध, सरे नियम तोडून तिचे डोळे,
मझ्यासाठी वहात होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते

ज्या खांद्यावर ती, डोक ठेवायची
विश्वासानी, प्रेमानी ... लाडानी
पण आता.... भरल्या डोळ्यानी
आभाळाच्या सवालीपेक्षा आधाराच्या खांद्यावर
आज आभाळ कोसळत होते,
सर्वांना माहित आहे तीच नाव ...आज तिला सारे, "नवरी" म्हणत होते
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

तिच्या छातिचे ठोके
भरलेले डोळे, उसासे.... हुंदके
साठवत होतो मी..
एकटाच रडत होतो मी
माझे नाव तिच्या मनाच्या प्रत्य्रेक कोपर्यात होते
आणि तिलाही माहित आहे, तिला
मला शेवटचे पहायचे होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

आणि ती निघून गेली मला एकदाही न पाहता
जणू अनोळखी होतो आम्ही
अन अनोळखीच राहू आता
डोळ्यांशिवायही तिच मन
मला वळुन पाहत होते
का म्हणुन ते रडणे तिचे
माझे मन जाळत होते .......
मला माहित आहे, तो लाल रंग...ते दागिने तिचा जीव घेत होते...

अम्बरीश
१०/०९/२००७

No comments: