नवरी .... (एक विदारक सत्य)

या कवितेच नाव ऐकल्यावर बरेच लोक विचार करतात की ही एक "नवरी" च वर्णन करणारी.. तिच सौन्दर्य वर्णन करणारी कविता आहे.. पण कविता ऐकून झाल्यावर मी बर्याच मुलींच्या डोळ्यात पाणी पहिल आहे.."मनाविरुद्ध लग्न" हे त्या मुलींनी भोगल असेल कदाचित...तुम्हीही नक्की वाचा


आणि जातांना ती वेगळीच हसली
डोळ्यांमधे पाणी होते .......
थरथरणार्या ओठांवर, माझेच नाव होते
मला माहित आहे, तो लाल रंग...
ते दागिने तिचा जीव घेत होते...

स्पर्श !.... स्पर्श आठवत असतील तिला
प्रेमाचे, करूणेचे ...... माझे
आणि आता .... संत्वानाचे
विस्कटलेल्या आठवणी एकवटून,
डोळ्यात सामावून जात होते
सरे बंध, सरे नियम तोडून तिचे डोळे,
मझ्यासाठी वहात होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते

ज्या खांद्यावर ती, डोक ठेवायची
विश्वासानी, प्रेमानी ... लाडानी
पण आता.... भरल्या डोळ्यानी
आभाळाच्या सवालीपेक्षा आधाराच्या खांद्यावर
आज आभाळ कोसळत होते,
सर्वांना माहित आहे तीच नाव ...आज तिला सारे, "नवरी" म्हणत होते
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

तिच्या छातिचे ठोके
भरलेले डोळे, उसासे.... हुंदके
साठवत होतो मी..
एकटाच रडत होतो मी
माझे नाव तिच्या मनाच्या प्रत्य्रेक कोपर्यात होते
आणि तिलाही माहित आहे, तिला
मला शेवटचे पहायचे होते..
तो लाल रंग, ते दागिने तिचा जीव घेत होते...

आणि ती निघून गेली मला एकदाही न पाहता
जणू अनोळखी होतो आम्ही
अन अनोळखीच राहू आता
डोळ्यांशिवायही तिच मन
मला वळुन पाहत होते
का म्हणुन ते रडणे तिचे
माझे मन जाळत होते .......
मला माहित आहे, तो लाल रंग...ते दागिने तिचा जीव घेत होते...

अम्बरीश
१०/०९/२००७

शक्ति दे, शक्ति दे......

कड कड कड कर निनाद, गड गड कर मेघनाद
चित्कार तुझा, वार तुझा, धरणी दुभंग आज
शक्ती रूप होवून ये, जाळ पाप, कर विनाश
हवुनी प्रसन्न मज तू, शक्ति दे, शक्ति दे......

चिरत जा भस्मांची, प्रेतांची वाट तू

निवडुंग दाट उभे, मार्गातून काट तू
वेग घे, उद्वेग घे, दणदणु दे सर्व आज
दाह-देह आग-प्राण, शक्ति दे, शक्ति दे......

दाही दिशा उजळू दे, लाल रंग पसरू दे

आत्म्याचा क्रोध तुझा, तांडवात उतरु दे
'त्राहि माम" चित्कार, रक्त रक्त उधळू दे
पुनश्च दानव विनाश, शक्ति दे, शक्ति दे......

जळून उठे आज इथे, रक्त तुझे, भक्त तुझे
आगेतुन कर मन तू, व्यक्त तुझे, सक्त तुझे
पसरू दे तनमनात, दाह तुझे, देह तुझे
अनुभवू दे शक्ती आज, शक्ति दे, शक्ति दे......

शक्ति दे, शक्ति दे......
शक्ति दे, शक्ति दे......
शक्ति दे, शक्ति दे......

--- अम्बरीश
२३/०९/२००८

सल मनातली !!!

आता मनातली या, सल काढता येइना..
मज देव भेटला तरीही, वर मागता येइना
दिवस कठीण वैरी, येती भरून डोळे
माझ्या मनीचे मजला, तुज संगता येइना....

म्हणुनी उगाच शाई, उमटावी अलगद वरुनि
परी चित्र मनातले या, रेखाटता येइना..

कुणी प्रेम भंग म्हणतो, कुणी वेड एकेकाचे
जगास दू:ख माझे, उद्-गारता येइना..

जग वेगळे म्हणोनी, मज वेगळेही केले
मन वेगळे तरीही, झिडकारता येइना...

कार्ये दिनी अनंत, सांगुन सर्व गेले
पण कार्य आसवांचे, मज टाळता येइना..

मी थांब वदलो तेव्हा, थांबून श्वास गेले
पण देही असे वासना, ती थांबवता येइना...

आता मनातली या, सल काढता येइना..

अम्बरीश
१२/०६/२००८

माझ्या आर्त गाण्याला ....

जड़ जाहला देह ऐसा, देवही आता पोसत नाही
माझ्या आर्त गाण्याला या, सुरांचा भारही सोसत नाही...

भोगले जे सर्व काही, पापही अन पुण्य सारे
लावुनी गणिते जगाची, स्वर्गास मी पोहचत नाही

बंद नेत्रांची कथा मी, सांगतो एकांत देशी
उघडता नेत्री कुणाची, सावलीही दिसत नाही

घर म्हणावे की दुरावा, रहते ही फ़क्त आत्मा
देह का जपत राहतो, माझे मलाही कळत नाही

श्वास घेतो तर जीवंत, नेत्री दृश्याचिच खंत
काळ टळतो म्हणुन जगणे, असे आता जगवत नाही

आहे ना उरला कुणी, प्रतिमेचा झालो ऋणी
का विचारू मी जगाला, मज आरसा ओळखत नाही

अम्बरीश
२०/०५/२००६

त्या मार्गावरून...!!!

एक नाटकात, आम्हाला एक कवितेसारखा dialog हवा होता. तो इथे लिहला आहे..
कव्यान्जलिचे रसिक वाचक सहज context समजुन घेतील, याची खत्री आहे...

वाटत, त्या मार्गावरून, पुन्हा एकदा जावे
त्या अस्पष्ट संघर्षाला, पुन्हा समोरे जावे

पण मला अड़वतात त्या आठवणी......
ज्यांच्यासोबत मी राहिलो
ज्यांच्यासोबत मी लढलो
अन ज्यांच्यासोबत मी हरलो

पुन्हा तिकडे वळण्यासाठी, नाही म्हणतात सगळे
जाणत नाही कुणी, काही हिशोब राहिले मोकळे

पण पुन्हा मी एकदातरी.......
मी जाइल तिथे हरायला
मी जाइल तिथे लढायला
मी जाइल पुढे सरायला

आणि एक डाव असा जिंकुन येइल मी
मग सर्व जगाला दाखवेल कमी....

कारण मी जिंकुन घेतलेला ...
तो डाव असेल माझा
तो डाव असेल शेवटचा
तो डाव असेल मृत्यूची

हजार अभिमन्यु युद्धात या, जरी पडतील धारातीर्थी
चक्रव्यूह हेच तोडून जाइल, नर एक अन सोबत सार्थी

नर एक अन सोबत सार्थी ......

अम्बरीश
०६/०३/२००४

बस एकच जगणे लिहायचे !!!!!!

मी पुन्हा मोजायची का, तीच किम्मत जगण्याची
का इथे नाहीच जगणे, फ़क्त वाट ही मरणाची
का मीच सांगू जगाला, आज भाषा या मनाची
तेच जगणे, तेच मरणे, हीच वाट जीवनाची

"नाही" म्हणणे कुणास कळले, फ़क्त भोगिले दू:ख सारे
तरीही रडते मग झगड़ते, का वाहती विरुद्ध वारे
परी मोजुन श्वास ठोके, दिवस पुढे ढकलायचे का?
रोज मारुनी उठायचे अन्, रोज उठुनी मरायचे का?

भोगले ते शाप होते, आणि भोगही पाप होते
दूर कोसंवर नभातिल, तारकांचे कोप होते
नशीब म्हणता हेच सारे, रटाळ तरीही जगायचे का?
याच धरतीवर पुन्हा मी, मतिसवे उडायचे का?

डोंगराची कुठे ऊँची, सावली मज सोसवेना
पाहू मी वरती कुणा, कुणी भावना ही पोचवेना
दिव्या कुणी असते म्हणे ते, शहाणे सारे सांगताती
रक्तात हात, डोळ्यात आसू, तरीही स्तुति खरडून गाती

कुणीही नाही सोबत आता, फ़क्त जखमा सर्व अंगी
चौमुखी आहे म्हणे तो, कुणी म्हणे तो भास्मांगी
जर दिसे त्याला जगाची, सर्व दू:खे सर्व लोकी
मीच का उरतो असा की, टाकिला इतरात बाकी

वर बघुनी मिटती डोळे, जग हे सारे वेंधळे रे
आस ठेउनी उन्चावारी, वर मृगजळी सपळे रे
लिहले पाहिले ललाटी तर, का हे मरणे जगायचे
लिहणार्यानेच द्यावे वचन, बस एकच जगणे लिहायचे

बस एकच जगणे लिहायचे !!!!!!


अम्बरीश
१२/०८/२००६

दरवळ....

या कवितेला "The CreativeBytes" तर्फे झालेल्या काव्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते..
तसेच राहुल देशपांडे, यांनी या कवितेचे कौतुक केले होते..

मातीचा गंध
उठे सुगंध
होई निर्बंध
कसा हा दरवळला...

सुगंधी श्वास
हाती आकाश
असा विश्वास
मनामधे सळसळला

गर्द ते मेघ
काजळी रेघ
आज उद्वेग
त्वचेवर सरसरला

नभ तो नीळा
ढगांचा टीळा
घेउनी खुळा
बघ कसा गडगडला

अश्रुमय अक्ष
टाकी कटाक्ष
बघतेस लक्ष
लक्ष पाउस धारा

मनाचे बांध
करी निर्बंध
असा तो शित
संथ वाहे वारा

दिसतसे क्षितिज
त्यागतो आज
त्यामधे अब्ज
अब्ज मी किरणाहुती

केशरी रंग
त्यामधे दंग
गावुनी अभंग
गंधली ही माती

अम्बरीश
१०/१०/२००५

पाऊसधारा...

आतून अडून सूर्यही बघतो,
उधाण समुद्र किनारा...
ठेउन आज मल्हार बाजूला
मी गातो पाऊसधारा...
खडकावरुनी लाट सरावी
तसा अंगावरुनी वारा..
तन मनात उठुनी शहारा
मी गातो पाऊसधारा...

धूसर नभाची नाती गोती
सभा मंडपी येती.....
जणू जडावे रूणानुबंध
आलिंगने ती देती....
झाकुनी मग मी सूर्यलाही
फुलवून मोर पिसारा
मी गातो पाऊसधारा...

दरवळ उठतो धरती वरती
चाहुल पाहुणा देतो....
रिमझिम बरसून झाडान्वरती
कड़े कपारीत वळतो....
खळखळणार्या पाण्यासन्गे
मोहरता तुझा इशारा...
मी गातो पाऊसधारा...

विरळ नभातुन सूर्य अचानक
प्रभात किरणे देतो ....
जणू अंगावर हात तुझा
कुरवाळुन मी घेतो ..
वाहे गारठा हिरव्यारानी
पण, उबदार तुझा निवारा
मी गातो पाऊसधारा...

पाऊस रिमझिम सूर्यासंगे
नविनच नाते विणतो...
मायेच्या उबेत अचानक
सडा प्रेमाचा पडतो...
ईंद्रधनु जेव्हा अवनिला
करतो लऊन मुजरा...
मी गातो पाऊसधारा...

अम्बरीश
१२/०९/२००८